पावसाळा सुरु झाल्यावर राज्यभरातून पर्यटक लोणावळ्यात धबधबे आणि निसर्गाचा आनंद घ्यायला येतं असतात दरम्यान असचं एक कुटुंब एन्जॉय करायला आलं आणि पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात उतरलेलं अख्ख कुटुंब वाहून गेल्याची धक्कादायक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हिडीओत कुटुंबातील ५ जण पाण्याच्या मधोमध उभे असल्याचं दिसत आहे. पाण्याचा स्तर आणि वेग जास्त असल्याने अखेर त्यांचा तोल जातो आणि सर्वजण एकत्र वाहत जाताना ते दिसत आहेत.भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्यात अन्सारी कुटुंब वाहून गेलं आहे. रेल्वेचा वॉटर फॉल म्हणून हा धबधबा ओळखला जातो. वाहून गेलेल्यांपैकी 36 वर्षीय महिलेसह 13 आणि 8 वर्षाच्या दोन मुलींचे मृतदेह सापडले आहेत. 9 आणि 4 वर्षाच्या मुलाच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे.
आता काय मुहूर्त काढायचा का? भाजप प्रवेशावरून गिरीष महाजणांचा खडसेनां टोला
लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे? योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता ; अर्ज कसा करावा जाणून घ्या…
Police bharti ; धावतांना अमळनेरच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
https://x.com/ItsKhan_Saba/status/1807438827726024929?t=EJaejLeqowytNgq2OXU83w&s=19
सीसीटीव्हीत अन्सारी कुटुंबातील पाचही जण पाण्याच्या मधोमध उभे असतांना पाण्याचा वेग प्रचंड वाढलेला आहे. दुसरीकडे कुटुंब एकमेकाला घट्ट पकडून पाण्यातून वाहून जाऊ नये यासाठी प्रयत्न करतांना दिसत आहे तर दुसरीकडे बाहेर असणाऱ्यांपैकी काहीजण त्यांच्याकडे दोरी टाकत मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. पण काही वेळाने संपूर्ण कुटुंब पाण्यात वाहून जातं. पुढे गेल्यानंतरही ते जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण पाण्याच्या प्रवाहापुढे त्यांचा टीकाव लागत नाही आणि अखेर अख्ख कुटुंब वाहून जातांना दिसत आहे. या धक्कादायक घटनेने याठिकाणी आलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.









