मुंबई : लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात तब्बल 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समृद्धी महामार्गावर घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुसरबीड येथून मजूर घेऊन समृद्धी हायवेच्या कामावर हे मजूर जात होते. त्याच दरम्यान तळेगाव येथे हा अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गावर काम करणारे बिहारी मजूर असल्याचं वृत्त समोर येत आहे. एकूण 15 मजूर होते आणि त्यापैकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात इतरही काही मजूर जखमी झाले आहेत. या जखमी मजूरांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले आहे.