डिजिटल युग असले तरी आपल्या प्रत्येकाच्या व्यवहारात एकदा काय बऱ्याचदा पत्रव्यवहार आला आहे आणि येतोच, आपण पत्रव्यवहार करतांना ‘पोस्टल पिन कोड’ नमूद करतो कारण या पिन कोडं शिवाय तुमचं पत्र पोहचणार नाही याची शास्वती आपल्या नसते आणि खरं देखील आहे.पण आपण कधी विचार केला आहे का, या ‘पिन कोड’ ची संकल्पना कशी आली असेल, कोणी आणली असेल.. तर जाणून घेऊया ‘पोस्टाच्या पिन कोड’ चे जनक यांच्या बाबतीत…
श्रीराम भिकाजी वेलणकर हे भारतीय टपालखात्याच्या ‘पिन कोड’ प्रणालीचे जनक होते. ते संस्कृत व पाली भाषेचे गाढे अभ्यासकही होते. पोस्ट आणि टेलीग्राफ खात्यात नोकरीत असतांना श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी त्यावर उपाय म्हणून १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली.
आज १ एप्रिल श्रीराम भिकाजी वेलणकर यांचा स्मृती दिन आहे.
टपाल खात्यात नोकरीत असताना, निरनिराळ्या भाषा, अपुरे पत्ते यावर उपाय म्हणून त्यांनी १५ ऑगस्ट१९७२ रोजी पिनकोड पद्धत अंमलात आणली होती.