u
चाळीसगाव (प्रतिनिधी)-जळगाव जिल्हयातील चाळीसगाव तालुक्यातून 2012 साली अमरावती येथे स्थलांतरित झालेली निवासी शाळा 2014 साली पाठपुरावा करून प्रसंगी शासनाशी भांडून पुन्हा जळगाव जिल्हातील चाळीसगाव येथे आणली. या शाळेतून सुमारे सातशे विद्यार्थ्यांना दर्जेदार डिजिटल शिक्षण दिले जाणार आहे. शिक्षण हे वाघिणीची दूध असून जो हे आत्मसात करेन तो वाघा सारखा गुरगुरायला लागेल हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशाला या निमित्ताने पुन्हा उजाळा मिळाल्याचे समाधान आहे. या शाळेची पुन्हा पायाभरणी केल्याने बाबासाहेब यांच्या संदेशाचे अनुकरण केल्याचे समाधान जिल्हावासीयांमध्ये आहे. ही शाळा पुन्हा जळगाव लोकसभेत साकारली जाते आहे याचे मनस्वी समाधान जिल्हा वासीयांमध्ये आहे .
युती सरकारने २ एकर जमिनीसह साडे बारा कोटी रुपयांच्या निधी मंजूर केल्याने जिल्ह्यातील पहिले G+2 (जी प्लस टू ) सोयी सुविधा युक्त अत्याधुनिक विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक भवन साकारले जाणार आहे. बाबासाहेबाना अभिप्रेत शिका संघटित व्हा संघर्ष करा विचारांवर पुढली पिढी घडावी म्हणून चाळीसगाव येथील शाळेला पुन्हा मंजुरी मिळवून दिली आहे.एकाच वेळी पहिली ते सातवीच्या सातशे विदयार्थ्यांना शिक्षण देणारी निवासी शाळा जिल्ह्यात एकमेव आहे.आज शाळेचे बांधकाम प्रगतीपथावर असून येत्या शैक्षणिक वर्षात ही शाळा तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या मुलां साठी खुली होणार आहे.शाळेचे सर्व कामकाज आणि नियंत्रण शासनाचे असल्याने भविष्यात अनेक संस्कारक्षम पिढ्या येथे घडणार आहे आज डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलाच्या कामाची जिल्हावासीयांना आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.