लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे) येथे महावितरण कंपनीचा मनमानी कारभाराला ग्रामस्थ कंटाळले असून लवकरच रस्ता रोको करण्याच्या तयारीत आहेत. कारण लोहारा हे गाव वीस ते पंचवीस हजार लोकवस्तीचे असून गावामध्ये नेहमीच खेड्या वरून मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग आपापली कामे (इलेक्ट्रिकल्स उपकरणे) करण्यासाठी येत असतात मात्र गावात लाईट नसल्यामुळे ग्राहकांची वेळेवर कामे होत नसल्याने व्यापारी वर्ग देखील नाराज आहेत. तसेच ऑनलाइन कामे सुद्धा पूर्ण होत नाहीत, पिठाची गिरणी देखील वेळेवर चालू नसते कारण लाईटच नसते. त्यामुळे महिला वर्ग देखील त्रस्त झालेल्या आहेत. दिवसातून तब्बल सात ते आठ वेळेस लाईट गायब असते. कोणतीही वेळ ही महावितरण कंपनीला नाही आहे रात्री थकून आलेला शेतकरी वर्ग देखील आरामाची झोप होत नसल्याने त्रस्त झालेला आहे. लाईट गेल्यावर सुद्धा महिन्याला मात्र वेळेवर बिल मोठ्या प्रमाणात येत आहे. शिल्लक काम जरी असले तरी वायरमन पूर्ण गावाची लाईट बंद करतात व बरेच कर्मचारी गावात रहिवास करत नसल्यामुळे रात्री चा लाईट गेल्यानंतर नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचा काही एक समन्वय नसल्याने कोणतेही लाईट येण्या जाण्याचे वेळापत्रक नाही आहे. त्यामुळे कर्मचारी वर्ग मनमानी पद्धतीने महावितरण कंपनीचा कारभार चालवत आहेत त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी वेळीच योग्य ती पावले उचलून लोहारा गावातील लाईट सुरळीत चालू करावी नाहीतर जनतेच्या रोशाला अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागेल हे मात्र नक्की.









