आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने वातावरणात मोठा बदल झाला आहे. राज्यात पुढील एक-दोन दिवसांत याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून या बदलत्या वातावरणामुळे राज्यातील १३ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.पुढील पाच दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुढील पाचही दिवस हवामान खात्याने विविध जिल्ह्यांना तीव्र पावसाचा इशारा दिला आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने मध्य-पूर्व अरबी समुद्रात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १९ नोव्हेंबरनंतर याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुढचे 4-5 दिवस राज्यात वीजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी पावसाची शक्यता . येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा . तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3QwEY भेट द्या pic.twitter.com/yfxVnSWjbG
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) November 15, 2021