फुलगाव,(प्रतिनिधी)- फुलगाव येथील ग्रामपंचायत समोरील मोबाईल टावर हे नियम बाह्य असून पुराव्यानिशी ते स्पष्ट झाले आहे तरीसुद्धा संबंधित अधिकारी या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यास दिरंगाई करत असल्याचा आरोप तक्रारदार स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी केला आहे.
महेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे की,गट विकास अधिकारी भुसावळ विलास भाटकर यांना निवेदन अर्ज केले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले या दिवशी चौकशी करतो, त्या दिवशी चौकशी करतो आणि चौकशी आदेश काढून सुद्धा चौकशी ला येत नाही दिनांक 10 नोव्हेंबर 2021 रोजी चौकशी आदेश काढून विस्तार अधिकारी पाटणकर हे देखील आले नाही त्यांनी नेहमी उडी चे उत्तर दिले व चौकशीसाठी खर्च लागतो तो आमच्याकडे नाही आमच्याकडे वेळ नाही असे काही सांगून दिशाभूल करतात. तरी या प्रकरणी अधिकार्यांवर जिल्हा परिषद सीईओ यांनी कारवाई न केल्यास युवा स्वाभिमान पार्टी आमरण उपोषणाला बसेल असे महेंद्र पाटील जिल्हाध्यक्ष यांनी कळविले आहे.