चाळीसगाव | विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून विहिरीत पडल्याने ४० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यु झाला. सोमवार िद. २५ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रांजणगाव येथे ही घटना घडली.
संजय अरूण पाटील असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतात कापूस वेचण्याचे काम सुरू असताना मजूर महिलांसाठी पाणी आणायला, संजय पाटील हे बस स्टॉपजवळील महादेव मंदिराच्या पाठिमागे असलेल्या विहीरीवर गेले हाेते. पाणी काढत असताना पाय घसरून ते विहिरीत पडले. या घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी चेतन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद झाली.