नागपूर – दसरा मेळाव्यात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा बंगाल करायचा असल्याचे म्हटलं होतं त्यावर प्रत्युत्तर देत आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बंगालमध्ये एकही उद्योग टिकत नाही, विरोधात बोलणाऱ्यांना ठार मारलं जातं. मग तीच परिस्थिती त्यांना महाराष्ट्रात निर्माण करायची आहे का? जोपर्यंत आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल कधीही होऊ देणार नाही, महाराष्ट्र हा महाराष्ट्रच राहणार असल्याचं म्हटलं आहे.
????LIVE | Media interaction, #Nagpur https://t.co/SFRpUekZ0V
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 16, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संघराज्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. काही डाव्या पक्षांना सोबत घेऊन त्यांनी भारताचे संविधान बदलण्याचा डाव आखला आहे मात्र आम्ही हे मनसुबे हाणून पाडू असंही देवेंद्र फडणवीस म्हटलं आहे.