नवी दिल्ली- वाहनचालकांनो, सावधान! आजपासून तुम्हाला कोणतंही वाहन चालवताना केलेली कोणतीही चूक भारी पडू शकते. देशभरात मोटर व्हेइकल कायदा आजपासून लागू होणार आहे. याअंतर्गत आता कुठल्याही नियमभंगासाठी पाचपट तर काही बाबतीत दहापट दंड आकारला जाणार आहे. कमीत कमी एक हजार ते अगदी 25 हजार रुपयांपर्यंत दंड या नव्या कायद्यांतर्गत बसू शकतो.
लायसन्स न बाळगल्यास पाच हजार रुपये दंड आहे, जो आतापर्यंत केवळ 500 रुपये होता. नशेत गाडी चालवण्यास आतापर्यंत दोन हजार रुपये दंड आकारला जात होता, तो आता थेट 10 हजार रुपये करण्यात आला आहे. केवळ दंडच नव्हे तर नियमभंग केल्यास तुरुंगात जाण्याचीही वेळ येऊ शकते.
काही नियमभंग आणि नवी दंड आकारणी
हेल्मेन न घातल्यास – आतापर्यंत 100 रुपये दंड होता, आता 1,000 रुपये दंड आणि तीन महिन्यांपर्यंत लायसन्स रद्द
विना परवाना वाहन चालवल्यास – आधी 500 रु., आता 5 हजार रुपये दंड.
दुचाकी अतिरिक्त भार – आधी 100 रु., आता 2 हजार रुपये दंड.
सीट बेल्ट न लावल्यास – आधी 100 रुपये, आता 1000 रुपये दंड.
वाहन चालवताना फोनवर बोलल्यास – आधी एक हजार रु., आता 5 हजार रु. दंड