Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पक्षबदलूंना मतदारांनीच धडा शिकवावा

najarkaid by najarkaid
September 26, 2019
in राजकारण
0
पक्षबदलूंना मतदारांनीच धडा शिकवावा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- केवळ राजकीय स्वार्थापोटी काही लोक पक्षांतर करतात तेव्हा त्याची योग्य ती काळजी घेणे, हे मतदारांचेच कर्तव्य असते. अशा पक्षबदलूंना मतदारांनीच योग्य तो धडा शिकवायला हवा. कारण सरतेशेवटी प्रत्येक लोकशाही देशात खरी शक्ती ही त्या देशाच्या नागरिकांमध्येच असते’, असे अत्यंत परखड भाष्य मुंबई उच्च न्यायालयाने केले आहे. त्याचबरोबर ‘केवळ बहुमतात असल्याने एखाद्याला अल्पमतात असलेल्यांचा गळा घोटण्याचा परवाना मिळत नाही. लोकशाहीत विरोधकांनाही तेच स्थान, तेवढाच सन्मान असतो आणि त्याआधारेच बहुमतात असलेल्यांना आपले शासकीय प्रशासन सुरळीत व सुयोग्यपणे हाकण्यासाठी योग्य दिशा मिळत असते’, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने अप्रत्यक्षरीत्या सत्ताधाऱ्यांचे कानही टोचले आहेत.

पक्षांतर व आमदारकीचा राजीनामा देऊनही मंत्रिमंडळात वर्णी लागलेले राधाकृष्ण विखे-पाटील व जयदत्त क्षीरसागर यांच्याविरोधातील याचिकांवर न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठाने १३ सप्टेंबर रोजी निर्णय दिला. राज्यघटनेतील तरतूद व त्याचा अन्वयार्थ लक्षात घेऊन न्यायालयाने त्या याचिका फेटाळून लावल्या. मात्र, आपल्या निर्णयात न्यायालयाने लोकशाही व पक्षांतराच्या प्रश्नावर अत्यंत परखड भाष्यही केल्याचे १५२ पानी निकालाची प्रत बुधवारी उपलब्ध झाल्यानंतर स्पष्ट झाले.

‘पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांना अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत विशिष्ट क्षेत्रातील तज्ज्ञांना ते विधानसभा किंवा विधान परिषदेतील सदस्य नसलेल्या व्यक्तींनाही मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेण्याची तरतूद आहे. मात्र, केवळ सत्तेत राहण्यासाठी, राजकीय हेतू साध्य करण्यासाठी किंवा सौद्यासाठी या तरतुदीचा वापर होईल, अशी कोणीही अपेक्षा करू शकत नाही. त्यामुळे प्रत्यक्षात असे होत असेल तर आम्हालाही सर्वोच्च न्यायालयाप्रमाणेच त्याविषयी चिंता व्यक्त करावी लागेल’, असे गंभीर निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले आहे.

‘राज्यघटनेतील अनुच्छेद १६४(४) याचा अन्वयार्थ याचिकादारांना जसा हवा आहे तसा आम्ही काढू शकत नाही. विधानसभेचा कार्यकाळ संपत असताना किंवा निवडणुकीच्या तोंडावर या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश राजकीय हेतूने केलेला असू शकतो. मात्र, केवळ त्यामुळे आम्ही त्यांना अपात्र ठरवू शकत नाही किंवा पक्षबदलू गृहित धरू शकत नाही. राज्यघटनेतील दहाव्या अनुसूचीमधील तरतुदींप्रमाणे त्याविषयीची स्वतंत्र कार्यवाही प्रलंबित आहे आणि त्याचा कायद्याप्रमाणे निर्णय लागेल. परिणामी सद्यस्थितीत त्यांचा मंत्रिमंडळ समावेश आम्ही बेकायदा ठरवू शकत नाही. मात्र, अशा परिस्थितीत राज्यघटना ही पक्षांतराला प्रोत्साहन देत आहे, हा याचिकादारांचा युक्तिवाद आम्ही मान्य करू शकत नाही. या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयानेही पूर्वी काही निवाड्यांत राज्यघटनेचा मूळ हेतू व त्याचे हितरक्षण करण्याचे खुद्द पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य यावर भाष्य केलेले आहे’, असे खंडपीठाने नमूद केले आहे. ‘महाराष्ट्रातील अलीकडच्या काळातील घडामोडी पाहता राज्यघटनेतील तत्त्वांची पायमल्ली होत आहे, या याचिकादारांच्या तक्रारीकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. मात्र, न्यायालयाला आपल्या मर्यादेतच काम करावे लागेल. न्यायालय या प्रश्नाकडे लोकांचे लक्ष वेधू शकते, मात्र मतदारांच्या भूमिकेत जाऊ शकत नाही. महाराष्ट्रातील मतदार साऱ्या घडामोडींची नोंद घेत असतील, याची आम्हाला खात्री आहे. अशा घडामोडींमुळे राज्याची शान वाढत नसून उलट प्रतिमा खालावत आहे, याचा विचार मतदारांनी करायचा आहे. हे सारे आम्ही त्यांच्या शहाणपणावर सोडतो’, असेही खंडपीठाने नमूद केले आहे.


Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मनपा स्थायी समिती सदस्यांची निवड जाहीर !

Next Post

कोकणकन्या एक्स्प्रेसचे इंजिन बिघडले; लोकल प्रवासी लटकले!

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
कोकणकन्या एक्स्प्रेसचे इंजिन बिघडले; लोकल प्रवासी लटकले!

कोकणकन्या एक्स्प्रेसचे इंजिन बिघडले; लोकल प्रवासी लटकले!

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us