मुंबई, (प्रतिनिधी)– सध्या महसूलचा आवश्यकता लक्षात घेऊन राज्याचे अर्थचक्र सुरू करण्यासाठी कोणत्याही नैतिक गुंत्यात न अडकता, महसुलासाठी वाईन शॉप सुरू करा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून दिला आहे. दारू पिणार्यांसाठी नव्हे तर महसुलाची गरज लक्षात घेत असा निर्णय घ्यायची वेळ आली असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
राज्यातील पेट्रोलपंप आज जवळपास बंद आहेत. जमिनींचे आणि स्थावर मालमत्तांचे व्यवहार ठप्प आहेत. दारूवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला ४१.६६ कोटी, महिन्याला १२५० कोटी आणि वर्षाला १५००० कोटी मिळतात. यावरून सरकारला होत असलेल्या व होऊ शकणार्या महसुली तोट्याचा विचार व्हायला हवा. टाळेबंदी आणखी किती दिवस चालेल याची खात्री नाही. त्यामुळे त्यामुळे कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्याच्या महसुलासाठी सरकारने वाइन शॉप उघडण्याचा विचार करावा अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.














