पालघर – आधी दोघांमध्ये प्रेम होतं नंतर प्रियसीचे लग्न दुसरीकडे लग्न ठरल्याने ही गोष्ट प्रियकराच्या जिव्हारी लागल्याने मोखाड्यात भरदिवसा आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अर्चना उदर असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे, या दोघात प्रेम संबंध असल्याचे समजते.
मृत्यू झालेली युवती अर्चना उदर ही १२ च्या वर्गात शिक्षण घेत होती. आश्रम शाळेतून महाविद्यालयात जात असताना तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आश्रम शाळेतून महाविद्यालयात चालत जाणाऱ्या विद्यार्थीनीवर रस्त्यातच कोयत्याने वार करत गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली.
मोखाड्यातील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात बारावीत विज्ञान शाखेत शिकणाऱ्या अर्चना उदर या विद्यार्थिनीवर हा जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला आहे. अर्चना ही बारावीत शिक्षण घेत असून महाविद्यालय ते आश्रम शाळा अशा पाचशे मीटरचा रस्ता पायी जात असताना अर्चनावर हा हल्ला करण्यात आला.
अर्चना सोबत असलेल्या तिच्या मैत्रिणींनी आरडाओरड सुरू केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. मृत मुलीचे आरोपीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तिचे दुसऱ्या ठिकाणी लग्न जमले होते. यामधून तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. प्रभाकर वाघिरे असे आरोपीचे नाव असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.















