बाराबंकी । एकीकडे मणिपूर घटनेवरून देशात संतापाची लाट असताना आणखी एक संतापजनक घटना समोर आलीय. भावाने बहिणीचे शीर शरीरापासून वेगळं केलं आणि शीर हातात डोके घेऊन तो गावात सुमारे 800 मीटर फिरला. बहिणीच्या प्रेमसंबंधाचा राग आल्याने आरोपीने हा प्रकार सांगितलं जात असून याप्रकरणी आरोपी भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आरोपीचे नाव रियाज असे असून ही घटना सकाळी 11.30 वाजता घडली. पोलिसांनी बहिणीचे शीर आणि मृतदेह ताब्यात घेतले आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकीमधील फतेहपूर पोलिस स्टेशन हद्दीतील मिठवारा गावातील आहे.
रियाजचा त्याच्या बहिणीसोबत घरातील काही गोष्टीवरून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळ वाट पाहिल्यानंतर तो घराबाहेर पडला. त्यानंतर तो परत आल्यावर त्याने बहिणीला कपडे धुण्यास सांगितले. रियाजची बहीण कपडे धुण्यासाठी घराबाहेर आली आणि पाणी भरू लागली.
त्यावेळी मागून आलेल्या रियाजने बहिणीवर हल्ला केला. बहिणीचे शीर धडावेगळे करून हातात घेऊन पोलिस ठाण्याच्या दिशेने जाऊ लागला. गावातील लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी वाटेतच रियाजला अटक केली.
गावकर्यांचे म्हणणे आहे की, ‘रियाजची बहीण गावातील प्रियकर चांद बाबूसोबत पळून गेली होती. 29 मे रोजी कुटुंबीयांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तरुण आणि तरुणी दोघांना गावाबाहेरून पकडले होते. तरुणाची रवानगी तुरुंगात करण्यात आली. तर मुलीला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
गावकरी सांगतात, ‘यावरून घरात खूप भांडण होत होते. या प्रकारानंतर रियाजला बहीण आवडत नव्हती. दोघांमध्ये रोज वाद होत होते. शुक्रवारी सकाळीही दोघांमध्ये वाद झाला. यानंतर रियाजने हे कृत्य केले.