जळगाव,(प्रतिनिधी)- तालुक्यातील मोहाडी गावाचा ५० वर्ष पासून प्रलंबित काम लागले मार्गी लागले असून या गावात आज पाणीपुरवठा व स्वछता मंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचा जलजीवन निधी अंतर्गत ४ कोटी ५० लक्ष रुपये इतकी निधी दिला आहे.दरम्यान पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचे मोहाडी चे ग्रामस्थ यांनी आभार मानले आहेत.
गेल्या ५० वर्षे पासून प्रलंबित असलेल्या मोहाडी गावाच्या पाण्याच्या प्रश्न ना.गुलाबरावजी पाटील व पवनभाऊ सोनवणे यांनी १ वर्ष्यात मार्गी लावला मोहाडी गावात विहीरीचे काम सुरू झाले असून ५० वर्ष पासून मोहाडी ग्रामस्थ यांची मागणी आज पूर्ण झाली असून या साठी सतत पाठपुरावा जिल्हा परिषद सदस्य पवनभाऊ भिलाभाऊ सोनवणे यांनी लावून धरला असता वेळोवेळी कागदपत्रे ची पूर्तता मोहाडी येथील सरपंच धनंजय भिलाभाऊ सोनवणे यांनी केली असून ग्रामपंचायत चे सर्व सदस्य यांनी मदत केली धनंजय सोनवणे पवनभाऊ सोनवणे यांचा गावकरी ग्रामपंचायत सदस्य यांनी आभार मानले असून आज गावात आंनदाचे वातावरण आहे