जळगाव : कापसाला भाव मिळावा यासाठी बुलढाण्यात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असून कापसाला भाव मिळावा यासाठी बुलढाण्यात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचा प्रकार घडला. या प्रकारावर राज्यभरातून सरकारवर टीका होत आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बुलडाण्यात सुरू असलेल्या शेतकरी आंदोनाला ते नौंटकी म्हणाले आहेत.
आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना घडली आहे. लाठीमार करणं चुकीचा आहे, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी आंदोलन आहे. हे मला पसंत नाही. आंदोलनाचे अनेक मार्ग आहेत. अतिरेक करणं चुकीचा आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
हे पण वाचा..
भरधाव कारने वरातीत नाचणाऱ्या लोकांना उडवले ; घटनेचा थरार व्हिडीओ व्हायरल
धक्कादायक ! काक आणि भावाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Big Breaking ! राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर ; नवे राज्यपाल म्हणून यांची नियुक्ती?
नोकरीत बढतीचे योग, थांबलेली कामे पूर्ण होतील ; आज काय म्हणते तुमची राशी?
मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून एका कार्यक्रमासाठी ते जळगाव शहरातील जिल्हा रुग्णालयात उपस्थित होते. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘महापुरुषांच्या जयंती साजरी करण्याबरोबरच वेगवेगळे कार्यक्रम घेतले पाहिजे. त्याच माध्यमातून डोळ्यांचं शिबिर झालं. यात महागड्या डोळ्यांच्या लेन्स रुग्णांना बसवून देण्यात आल्या. त्या रुग्णांना भेटण्यासाठी आलो’, असल्याचं यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले. यावेळी रमाई यांच्या जयंतीनिमित्त असं बोलताना एकनाथ शिंदे यांच्या जयंतीनिमित्त, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. त्यानंतर लगेच त्यांनी चूक सुधारली आणि वाढदिवसानिमित्ताने, असा उल्लेख केला.