जळगाव – एम.आय.डी.सी.पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी शाळा, महाविद्यालयीन मुली आणि महिलांच्या वाढत्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर बनवण्याची गरज लक्षात घेऊन येथील बी.यू.एन.रायसोनी मराठी विद्यालयात आज दि.22 रोजी ‘आत्मरक्षण’ या विषयावर मार्गदर्शन केले.
जळगाव जिल्हा पोलीस विभाग व जिंदगी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींना ‘आत्मरक्षणा’बाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. रायसोनी शाळेत आयोजीत कार्यक्रमात पी.आय.रणजीत शिरसाठ, विश्वास बोरसे, जिंदगी फौंडेशनचे सुष्मी भालेराव, अजय पाटील उपस्थित होते. प्रथम मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
वृत्तपत्रात रोज घडणार्या मुली व महिलांच्या अत्याचाराच्या गटना वाचून मन धास्तावते. त्यामुळे आजच्या काळाची गरज म्हणून मुलींनी स्व-संरक्षणाचे धडे घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पी.आय.रणजीत शिरसाठ यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, असामाजिक तत्वांवर अप्रिय घटनांदरम्यान आपल्या जवळील उपलब्ध वस्तूंद्वारे कशाप्रकारे संरक्षण करता येऊ शकते याबाबत माहिती देत त्यांनी विविध आत्म-संरक्षण तंत्राविषयी तपशीलवार वर्णन केले.















