वन कर्मचाऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास
जळगाव ;- विमानतळ परिसरात दाेन बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाने दोन पिंजरे लावले होते . मात्र नर मादीचे दोन बिबटे वन विभागाच्या पिंजऱ्यात आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास जेरबंद झाल्याने कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.
मागच्या आठवड्यात पिंजरे लावण्यात आले होते . मात्र या दोन बिबट्यानी चकमा देत पिंजऱ्याजवळ दोन तास थांबून मग या ठिकाणाहून निघून गेले होते . वनविभागातर्फे बिबट्यांना पिंजऱ्यात अडकवण्यासाठी दाेन बाेकडबांधण्यात आले होते.
विमानतळाच्या परिसरातील बिबिटे पकडण्याची परवानगी मिळाल्याने मागच्या आठवड्यात गुरुवारपासून या ठिकाणी दाेन पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी एक बाेकड सावज म्हणून बांधण्यात आला होता. . तसेच पिंजऱ्यात मांस तुकडे ठेवण्यात अाले हाेते. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने आजूबाजूच्या रहिवासी भागात भीतीचे वातावरण पसरले होते .आज पहाटे मानव वन्यजीवरक्षक राजेश ठोंबरे , वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई यांच्या मदतीने दोन्ही बिबटे पिंजऱ्यात जेरबंद झाले . पशु वैद्यकीय अधिकारी संजय खचणे यांनी दोन्ही बिबट्यांची तपासणी केली . दोन्ही सुदृढ असल्याचे सांगितले . आता या बिबट्यांना जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली .
यांनी घेतले परिश्रम
उपवनरक्षक डी . डब्ल्यू . पगार , वनपरिक्षेत्र अधिकरी एन.जी पाटील , मानव वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे ,वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई ,वनपाल पी. जी . सोनवणे ,सी. व्ही. पाटील ,दीपक पाटील ,उल्हास पाटील, जितेंद्र चिंचोले ,अश्विनी ठाकरे, वैशाली , डी. डी. पवार आदी वनरक्षक व वन मजुरांच्या साह्याने ते बिबटे पकडण्यात यश आले.