जळगाव (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून शहरातील रस्ते हे खड्ड्यांचे रस्ते बनले आहेत.राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांनी पुढाकार घेऊन खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेतला तेव्हा कुठे मनपाला जाग येऊन कर्तव्याची जाणीव झाली व खड्डे बुजविण्यासाठी पुढे आली मात्र शहरातील गणपती नगर येथे खड्डे बुजविण्यासाठी चक्क जुन्या घरांची तोड फोड केल्यावर जे वेस्टेज विटांचे तुकडे,प्लास्टरचे तुकड्याच्या मटेरियल ने बुजविण्याचे “जावईशोध” लावण्याने जळगावकरांच्या मनात मनपा प्रशासना विरोधात प्रचंड संताप व्यक्त होतांना दिसत आहे.
महापालिकेने काही दिवसांपूर्वी हे खड्डे बुजविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र तो फसला. आता याच खड्ड्यांचे डांबरी किंवा काँक्रेटी पॅचवर्क करणे अपेक्षित आहे. खड्ड्यांच्या ठिकाणी व्यवस्थित खोदकाम करून तेथे डांबरी किंवा काँक्रेटी पॅचवर्क केला तर तो जास्त काळ टिकतो; पण येथे तसे न करता खड्ड्यांतील जुन्या घरांचे तोडलेले बांधकामाची विटांची तुकडे टाकून खड्डे बुजविण्याचे प्रयत्न महापालिकेकडून केला जात असल्याने मनपा प्रशासनावर शोशल मीडियावर चांगलीच टीकेची झोड उठली आहे.