जळगाव दि.१ – पाश्चिमात्य संस्कृती,महागडी जीवनशैली व विचारशैली आपण रोजच्या व्यवहारात अंंमलात आणली एकंदरीतच याचा प्रभाव आपल्या जीवनावर होतांना दिसत आहे मात्र साधी राहणी आणि उच्च विचार हेच यशस्वी आणि सुखी जीवनाचे गमक आहे असे विचार शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी विद्यार्थी संवादात मांडले.यावेळी प्रा. संदीप केदार यांनी लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या जीवनातील प्रसंग सांगितले आणि वाचन काळाची गरज आहे त्यामुळे तुम्ही पूर्वग्रह दुषित न राहता सतर्क राहता हे सांगितले.
के.सी.ई सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने विद्यार्थी तसेच शिक्षक यांनी महाविद्यालयातील परिसर स्वच्छता केली. सूत्रसंचालन व आभार प्रा.केतन चौधरी यांनी केले. यावेळी प्रा.डॉ.शैलजा भंगाळे, प्रा. सुनीता नेमाडे, प्रा. वंदना चौधरी, प्रा. स्वाती चव्हाण, प्रा.जयश्री पाटील, प्रा.कुंदा बाविस्कर, प्रा.रामलाल शिंगाने, प्रा.पंकज पाटील,ग्रंथपाल एम.एम.वनकर, प्रा.गणेश पाटील, प्रा. संदीप केदार, प्रा.शालिनी तायडे, प्रा.केतकी सोनार, संगीता पाटील आदी उपस्थित होते.