
मुंबई (विशेष प्रतिनिधी) महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल स्पष्ट झाले असून सर्वाधिक जागा महायुतीला मिळाल्याने महायुतीचे सरकार स्थापन करून सरकारचा शपथविधीसाठी दिवाळी नंतर 31 ऑक्टोबर रोजीचा मुहूर्त ठरल्याचे सूत्रांकडून समजते.
विधानसभेचे निकाल स्पष्ट होताच सर्वच प्रमुख पक्ष सत्तास्थापनेसाठी तयारीला लागले आहेत. यात आता शपथविधीची जागा ठरल्याची माहिती समोर येतेय. दिवाळी नंतर महाराष्ट्रातील नवीन सरकार सत्ता स्थापन करणार आहे.
31 ऑक्टोबरला महायुती सरकारच्या शपथविधीची शक्यता वर्तवली जात असून मुंबईतील महालक्ष्मी रेस कोर्सवर शपथविधी सोहळा पार पडणार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.















