- माझ्या कुटुंबावर टीका करणाऱ्यांना जनताच त्यांची जागा दाखवेल – गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी)जळगाव ग्रामीणचे मतदार हे शिवसेना-भाजपच्या विचारांचे आहे. पाच वर्षात केलेला विकास व जनसंपर्क असल्यामुळे मतदारसंघात उदंड व उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्याने विजय निश्चित आहे. आजवर जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे व प्रेमामुळे मी भारावलो असून विरोधकांना त्यांचा दारुण पराभव डोळ्यासमोर दिसत आहे. त्यामुळे ते वैयक्तिक व माझ्या कुटुंबावर टीका करीत असल्याने हरलेल्या विरोधकांची वृत्ती आज उघड झाली असून माझे कुटुंब असलेली जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल असे भावनिक उदगार सहकार राज्यमंत्री तथा युतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी शिरसोली येथील भर पावसात जाहीर सभेत काढले.

सभेत ज्या प्रमाणे पाऊस पडत आहे त्याच प्रमाणे धनुष्यबाणाला मतदान करून मतांचा पाऊस पडू द्या व प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहनही त्यांनी केले.पाऊस सुरू असतानाही हजारोंच्या संख्येने लोकांची गर्दी होती. गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर चौफेर टीका करून व शेर शायरी करून भर पावसात अक्षरशः धो – धो धुतले.
यावेळीशिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत , रिपाईचे अनिल अडकमोल,गोपाल जिभाऊ, रावसाहेब पाटीलव भगवान सोनार यांनीही गुलाबराव पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
शिरसोली येथील जाहीर सभेत व्यासपीठावर रिपाईचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल , समाधान पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर पवार, रासपच्या शितल चिंचोरे ,रावसाहेब पाटील,नाना सोनवणे,नगरसेवक विष्णुभाऊ भंगाळे,शरद तायडे,अर्जुन पाटील,धोंडू जगताप,अमित शकील, प्रविण पाटील,मुश्ताक मेंबर,बापू मराठे, शशी वाणी,शेणफडू पाटील,मुरलीधर ढेंगे, काळू मेंबर,जनाअप्पा कोळी, नंदू पाटील,बबन धनगर,ज्ञानेश्वर काटोले,विकास पाटील,विजय पाटील सरिता माळी, शोभाताई चौधरी, ज्योतीताई शिवदे, मनीषा पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन युवासेनेचे विकास पाटील यांनी केले तर आभार विजय पाटील यांनी मानले.















