मुंबई : ऐन पावसाळ्याच्या तोंडावर महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा कहर पुन्हा वाढला आहे. काही शहरांमध्ये ढगाळ वातावरण तर अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे. वारंवार होणाऱ्या या हवामान बदलांमुळे नागरिक त्रस्त आहेत. पुढील चार ते पाच दिवस उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. या भागातील बहुतांश भागात पारा ४० ते ४५ अंशांच्या दरम्यान राहू शकतो. मात्र, पारा वाढल्यामुळे काही ठिकाणी जोरदार वारे किंवा गडगडाटी वादळे येऊ शकतात.
खाजगी हवामान एजन्सी स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार, मध्य प्रदेश आणि दिल्लीच्या काही भागात उष्णतेच्या लाट गंभीर स्वरुप घेऊ शकते. विदर्भ, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, पश्चिम राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या वेगळ्या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेबाबत हवामान खात्याने अलर्ट जारी केला असून उष्माघात टाळण्यासाठी खबरदारी घेणं आवश्यक आहे.
हे पण वाचा :
..तर मास्क सक्तीचा आणि निर्बंधांचा निर्णय घ्यावा लागेल ; मंत्री विजय वडेट्टीवार
सुकन्या समृद्धी योजनेत 5 मोठे बदल! तुमच्यावर थेट परिणाम होईल, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या
महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, बिहार या राज्यांसह अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा कडक उन्हामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. मान्सूनपूर्व पाऊस आणि वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे पावसाचा प्रभाव कमी झाल्याचं पाहायला मिळतं. महाराष्ट्रातील विदर्भात, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात जणू आकाशातून आगीचा वर्षाव होत आहे.