वर्धा | वर्ध्यातील तळेगांव येथील एम. आर. जिनिंग मध्ये इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांना 10 हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे. कापसाला विक्रिमी भाव मिळत असल्याने शेतकरी जरी समाधानी असला तरी दरवर्षी होणाऱ्या भाववाढी मूळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
यावर्षी अतिपावसाने व बोंड अळीच्या पादुर्भावाने कापसाच्या उत्पन्नात मोठी घसरण झाली आहे. त्यासोबत संपूर्ण राज्यासह देश्यामध्ये कापूस उत्पादन असलेल्या ठिकाणी कापसाचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे यंदा इतिहासात पहिल्यांदाच कापसाला विक्रमी भाव मिळत असल्याचे दिसून येत आहे.वर्ध्यात खाजगी जिनिंग मध्ये नववर्षानंतर काल आणि आज शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 10 हजार रुपयांचे भाव मिळत आहे. यानंतर कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.असाच भाव मिळत राहिला तर पुढल्यावर्षी शेतकरी कापसाच्या पेरा वाढवेल आणि उत्पन्न वाढ होईल.
कापूस लागवडी पासून तर वेचाई पर्यंत शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात कापसावर खर्च करावं लागतं यात त्यामूळे खर्च जाऊन मोबदला मिळाला तर शेतकरी आनंद व्यक्त करतोय मात्र दरवर्षी पाहिजे तसा भाव कापसाला मिळत नाही यावर्षी कापसाला चांगला भाव मिळत असल्याने आम्ही समाधानी आहोत. फवारणी, खत,वेचाई यात मोठा खर्च होतो.शेतकऱ्याचं पिकांचे भाव पाहिजे तसे मिळत नाही मात्र यावर्षी मिळत असलेल्या भावाने शेतकरी सध्या तरी सुखावला आहे.