जळगाव,(प्रतिनिधी) – डोक्यावर कर्ज…. हाती आलेले पिकंही अतिवृष्टीमुळे गेलं यामुळे हतबल झालेल्या धरणगाव तालुक्यातील पथराड येथील शेतकऱ्याने कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि.28 रोजी सकाळी उघडकीस आली.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नावं किशोर सुरेश जाधव (वय ४४ , रा. पथराड ता. धरणगाव असे असून काल रात्री घरातील कडी लाऊन झोपायला गेलेला किशोर आज सकाळी पत्नी व कुटुंबीयांनी यास आवाज दिल्यावर दरवाजा उघडत नसल्याने काही लोकांच्या मदतीने दरवाजा तोडला. यावेळी किशोर हा विषारी कीटकनाशक औषध पिऊन पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने कुटुंबाने हंबरडा फोडला. दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .
यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे सर्व पिक खराब झाले किशोरवर कर्ज आहे. यामुळे त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असे ग्रामस्थ आणि आप्तस्वकीयांनी सांगितले याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. किशोरच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व आई असा परिवार आहे.