भडगांव – येथे मोहरम व गणेश उत्सव, शांतता कमेटी ची मिटींग अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांचे अध्यक्षतेत पार पडली यावेळी माजी पोलीस अधिकारी श्री.वंजारी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविकात धनंजय एरुळे म्हणाले की, भडगाव एक शांती प्रिय गाव आहे व भडगाव तालुक्यात सर्व समाज बाधंव एकजुटीने,सहकार्याच्या भावनेने पारंपरीक उत्संवाना ऐकमेकाना मदत करतात असे सांगत सालाबादप्रमाणे यावर्षी देखील उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. महावितरण चे अधिकारी श्री.दामोरे यांनी आपली अडचण सर्व लोकांन समोर व्यक्त केले शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष इम्रान अली सय्यद,नगरसेवक अमोल नाना पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. समीर जैन यांनी सी. सी. टीव्ही,लावल्या मुळे पोलिसानां ही मदत होईल व गुन्हे गारी वृतीच्या लोकाना बसेल जेणे करून गुन्हे होणार नाही.
पुढे प्रा.अनिल पाटील सर म्हणाले,समाज धर्म निरपेक्ष व्हावा…. यांनी एक छान उधारण व्यक्त केले स्वामी विवेकानंद व अल्ल्हामा इकबाल यांचे उदाहरण दिले. (हिंदू मुस्लिम बुद्ध सिख इसाई धर्म एकमेकांना एकत्रित ठेवण्यात आले पाहिजे) असे मत ही यावेळी व्यक्त झाले. अध्यक्ष भाषणात सचिन गोरे यांनी जातीय सलोखा ठेवने गर्जेचे असल्याचे सांगत अनेक मुद्यांनवर मार्गदर्शन केले. यावेळी नगरसेविका योजनाताई पाटील, भैय्या साहेब पाटील, नगराध्यक्ष सुनील देशमुख, राष्ट्रवादी,असंघटीत कामगार विभागाचे महाराष्ट्र समन्वयक सुरेंद्र मोरे, पंचायत समिती चे सभापती पप्पु दादा पाटील महावितरण चे पाटील, नायब तहसीलदार देवकर, आजी माजी नगरसेवक सर्व गणेश मंडळ चे अध्यक्ष व कार्यकर्ते पोलिसी कर्मचारी लक्ष्मण पाटील दादा ईश्वर पाटील उपस्थित होते.