मुंबई, (प्रतिनिधी)- कोविड -१९ महामारी साथीच्या आजाराची परिस्थिती बिघडत असताना महाराष्ट्र सरकारने १०वी च्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आज घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
सरकारने राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांचे आरोग्य आणि सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.