जळगाव, (प्रतिनिधी)- राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ मे पर्यंत कडक निर्बंध लावण्याचे निर्देश देतांना विविध घटकांना लाभ देण्याच्या ज्या घोषणा केल्या आहेत त्या ‘फसव्या’ असल्याचं ट्विट भाजपा जिल्हाध्यक्ष, आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांनी केलं आहे.
आमदार राजुमामा भोळे यांनी ट्विट करून म्हटलं आहे की,
राज्यात निर्बधांची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचे दाखवत शब्दांचे खेळ केले पण त्यांनी केलेल्या घोषणा फसव्या आहेत. अन्न सुरक्षा योजनेत ज्या गरीब कुटुंबांना स्वस्तात धान्य मिळते त्यांना दर महिना प्रति कुटुंब केवळ १०५ रुपये त्यासाठी खर्च करावे लागतात असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
