जळगाव : शहरातील प्रतयेक भागातील रस्त्यांची अमृत योजनेच्या नावाखाली आधीच वाट लागली असताना संततधार पावसामुळे रस्ते आणखी खराब झाल्याचा प्रत्यय आज आला . शिवाजीनगर भागात जाणार्या एसटीबस एका खड्ड्यात जाऊन पडल्याने ती एका बाजूला कलंडली . मात्र सुदैवाने मोठा अपघात टाळल्याने बसमधील ४५ प्रवासी सुखरूप राहिले. मनपाने रस्त्यांची तातडीने डागडुजी करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.














