Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ सुवर्णा दिलीप पाटील लिखित सुवर्ण जीवन प्रवास… भाग -2

najarkaid live by najarkaid live
March 11, 2021
in जळगाव
0
डॉ.सुवर्णा दिलीप पाटील यांनी लिहलेला सुंदर लेख सुवर्ण जीवन प्रवास…
ADVERTISEMENT

Spread the love

आधीच सांगितले की योगा म्हणजे एक जीवन पद्धती आहे त्यामुळे याला काही नियम लागू होतात.
जेथे नियम तेथे संतुलन.

आत्मा रथिम विध्दी शरिर रथमेव तू | बुध्दी तू सारथी विध्दीमन प्रग्रहमेवच ||

भौतिक देहरूपी रथामध्ये आत्मा हा स्वार आहे आणि बुद्धी ही त्याची सारथी मन हे लगाम आहे आणि इंद्रिये घोडे आहेत.
याप्रमाणे आत्मा हा मन आणि इंद्रयांच्या सहवासात सुख किंवा दुःख उपभोगतो.

योगाच्या माध्यमातून ह्या आत्मपिडा कमी करता येऊ शकतात. त्यासाठी काही नियम पाळणे गरजेचे आहे.
पतंजली ऋषींनी याचे आठ अंग सांगितले आहेत म्हणून याला अष्टांग योग असे म्हणतात.
यम ,नियम ,आसन ,प्राणायाम, प्रत्याहार ,धारना, ध्यान आणि समाधी.

१)यम: ताबा असणे. ज्यात भावनांचा उद्रेक होत नाही. एक आदर्श वाद.

२)नियम:स्वतःच्या आरोग्यासाठी शारीरिक असो वा मानसिक असो काही नियम पाळणे गरजेचे असतात. जसे सकाळी लवकर उठणे नियमित व्यायाम करणे असे बरेच काही.

३)आसने:शरीराची लयबद्ध हालचाल म्हणजे व्यायाम होय. ज्याला आपण आसन म्हणू. ज्याने शरीराची लवचिकता आणि ताकद वाढते. शरीरातील सर्व घटकांचे संस्थांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आसने गरजेचे आहे.

४)प्राणायाम:प्राणवायू ला शरीरात विनाअडथळा प्रवेश करता यावा व शरीराच्या अनुरेणू पर्यंत त्याचे सहज वहन व्हावे. ज्यामुळे प्रत्येक घटक हा पुनर्जीवित होत राहील. त्यासाठी करावयाची क्रिया म्हणजे प्राणायाम होय. ज्यामुळे शरीराचे आंतरिक शुद्धीकरण होते.

५ प्रत्याहार:प्रत्याहार म्हणजे विरक्त राहणे. जे जे आपल्यासाठी अयोग्य आहे म्हणजे आयोग्य आहार, अयोग्य संगत, अयोग्य शब्द यापासून माणसाने विरक्त राहणेच योग्य असते. ज्यामुळे मानसिक आरोग्यही चांगले राहते. वाईट आणि दुष्ट प्रवृत्ती पासून आपण जर विरक्त राहिलो तर आपली प्रगती सतत होत राहते.

६) धारना:पाहिले पाच अंग हे बहीर्अंग होय. ह्या पाच बहिर्अंगाच्या सहायाने शरीराला पुढील क्रियांसाठी तयार करणे. धारना एकाग्रता. ही एकाग्रता मिळवण्यासाठी आधी शरीराची तशी धारना करणे गरजेचे असते. कुरुक्षेत्रावर ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जीवनाचे सार सांगत होते. मानवी जीवनाचा उद्देश सांगत होते. अर्थात भगवद्गीतेचे ज्ञान देत होते. त्यावेळेस गीतेच्या सोळाव्या अध्यायात त्यांनी योगाचे महत्त्व सांगितले. ध्यान धारना याचे महत्त्व सांगितले.
तेव्हा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला एक प्रश्न विचारला, “ कृष्णा, तू सांगतो की योगा म्हणजे आपल्या आत्माच ब्रम्हाशी जुळणे होय. परंतु हे कायमस्वरूपी कसे काय राहू शकते? कारण माणसाचं मन किती अस्वस्थ, चंचल, अस्थिर आहे. वाऱ्या सारखं बेभान आहे. अशा मनाला कसे काय स्थिरत्व देता येईल. असे मन कसे एकाग्र होईल.?”
भगवान श्रीकृष्ण ,’हे पार्था मान्य आहे मन हे अस्वस्थ, अस्थिर आहे त्यावर ताबा मिळविणे अवघड आहे परंतु अशक्य नाही योगाच्या निरंतर अभ्यासाने त्याला स्थिर करता येऊ शकते.”

हा निरंतर अभ्यास म्हणजेच बहिर्अंगांचा अभ्यास आणि त्यानंतर धारना या स्थितीत येणे.

7) ध्यान:तल्लीनता . तल्लीन होणे. एकदा का शरीर धारणेसाठी तयार झाले की मन ध्यानस्थ होते तल्लीन होते. मनाची एकाग्रता वाढत गेली की आपण आपोआपच तल्लीन होऊन जातो. त्याच स्थितीत राहतो आजूबाजूचे भान आपल्याला राहत नाही बाहेरची कोणतीच शक्ती आपल्याला विचलित करू शकत नाही आणि ह्या स्थितीत आपला आत्मा आपल्या शरीराचे आतून परीक्षण करीत असतो.

८) समाधी:पतंजली योग सूत्राची हे शेवटचे अंग होय. समाधी म्हणजे विलीन होणे. आपली आंतरिक ताकत ही ब्रम्हांडाचा ताकदीशी विलीन होते आणि यावेळेस आत्मा आपल्या शरीराचे परीक्षण बाहेरून करतो त्रयस्थ म्हणून करीत असतो.

ज्या वेळेस ही ताकद ब्रह्मांडाच्या ताकदी सोबत विलीन होते. त्यावेळेस शरीराचा मेटॅबोलिक रेट हा खूप कमी होतो आणि त्यावेळेस सेल डिव्हिजन असेल ,शरीरातली चयापचयाची क्रिया असेल ही पण खूपच मंदावते. त्यामुळेच आपल्याला माहित आहे की ऋषी मुनि हे वर्षानुवर्ष समाधी अवस्थेत असायचे आणि तरुणच असायचे. कारण या समाधि अवस्थेमध्ये शरीरातील पेशींचं सेल डिव्हीजन हळू होते.

टिअर एन विअर ही क्रिया मंदावते आणि त्यामुळे भुक तहान या भावना सुद्धा होत नाहीत. कारण की तुमची एवढी एनर्जी सेल डिव्हिजन मध्ये रेगुलरली जाते तेवढी ह्या समाधीअवस्थेमध्ये जात नाही. जर क्रियाच मंदावली जाईल तर ती क्रिया करण्यासाठी लागणारी ताकद सुद्धा ही कमी लागते. म्हणून भूक आणि तहान आणि नैसर्गिक क्रियांचा वेग मंदावतो. त्यामुळेच हे ऋषी-मुनी वर्षानुवर्ष काहीही न खाता-पिता एकाच अवस्थेमध्ये बसून राहायचे त्याला आपण समाधी म्हणतो.

आजच्या काळामध्ये हे आपल्याला शक्य नाही किंवा आपला त्यावर विश्वासही बसत नाही. परंतु समाधि अवस्थेमध्ये काही काळ आपण बसू शकतो. जर नित्य यत्न केला तर आणि ह्या काळामध्ये आपण आपल्या आजूबाजूचं सुख दुःख, आवड-निवड, हेवेदावे, मत्सर या सर्व गोष्टींपासून काही काळ का असेना मुक्त होतो आणि हेच खरे आरोग्याचे गमक आहे.

समाधीचा अर्थच तो आहे. आनंद आणि दुःख यापासून अलिप्त राहणे. फ्री फ्रॉम पेन अँड प्लेजर.

आचरण दुसरे—झोपण्यापूर्वी एक किंवा अर्धा ग्लास कोमट पाणी प्यावे.
विश्लेषण— रात्रीच्या जेवणानंतर आपली शारीरिक हालचाल कमी होते त्यामुळे जेवणात असलेले तेल, तूप पदार्थ रक्तामध्ये शोषण्याचे प्रमाण जास्त होते. हा तेलकट भाग शरीरात कमी शोषला* *जावा व कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवू नये व लवकर बाहेर निघावा यासाठी हे कोमट पाणी मदत करते. तसेच रक्‍ताभिसरण सुरळीत करते.

*क्रमशः*

*डॉक्टर सुवर्णा दिलीप पाटील भडगाव*


Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगाव, चोपडा नगरपालिका क्षेत्रात दोन दिवसाचे निर्बंध जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले जाहीर

Next Post

आज जिल्हयात 954 कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 6 रुग्णांचा मृत्यू

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
अमरावती, यवतमाळमध्ये कोरोना विषाणूच्या ‘परदेशी स्ट्रेन’ बाबत आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण…

आज जिल्हयात 954 कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 6 रुग्णांचा मृत्यू

ताज्या बातम्या

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

February 25, 2026
Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

February 24, 2026
Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

February 24, 2026
धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

February 24, 2026
सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

February 24, 2026
Load More
Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

February 25, 2026
Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

February 24, 2026
Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

February 24, 2026
धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

February 24, 2026
सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

February 24, 2026

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us