जळगाव, (प्रतिनिधी) – लॉकडाऊन काळात 3 मे नंतर काय सुरु राहील आणि काय नाही या बाबत शासनाने घेतलेल्या निर्णया प्रमाणे महाराष्ट्रात परवानगी असलेल्या आणि परवानगी नसलेल्या बाबी नागरिकांन समजण्यासाठी व सोयीचे व्हावे. म्हणून तक्त्यात दर्शविले आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस दिवस वाढत असल्याने प्रशासनाच्या व जळगाव जिल्हा वासियांच्या चिंतेत वाढ होत आहे. नुकत्याच प्राप्त माहितीनुसार अमळनेर तालुक्यातील मुंगसे गावातील पहिली कोरोना बाधित महिला रुग्ण आज बरी होऊन अर्थात कोरोना मुक्त होऊन घरी गेली आहे. त्यामुळं कोरोना विषाणूला घेऊन नागरिकांनी मनात भीती बाळगू नये मात्र काळजी म्हणून प्रशासनाने वेळोवेळी दिलेले सूचना पाळून प्रशासनास सहकार्य करा व घरात राहून सुरक्षित राहा असे आवाहन दैनिक नजरकैद तर्फे करण्यात येत आहे.