जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव तालुक्यातील पाचोरा रोडवरिल रामदेववाडी येथे ७ मे रोजी झालेल्या अपघाताच्या घटनेतील संशयित आरोपी असलेल्या दोघांना मुंबई येथून अटक केल्यानंतर आज जळगाव येथील मे. न्यायालयात आरोपीना दुपारी 3:30 च्या सुमारास हजर केले दरम्यान न्यायालयाने त्यांना २७ तारखे पर्यंत पोलीस कोठडी दिली.यावेळी कोर्ट परिसरात मोठी गर्दी जमली होती, पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.
अटक बेकायदेशीर असल्याचा आरोपीच्या वकिलांकडून युक्तिवाद
संशयित आरोपी अखिलेश पवार याच्याकडून बाजू मांडताना वकील सागर चित्र म्हणाले की, या गुन्ह्यातील अटक ही बेकायदेशीर आहे. या गुन्ह्यात ३०४ हा गुन्हा लागूच होत नाही. २४ तारखेला आरोपींना अटक करतात मग यांनी १४ ते १५ दिवस मुंबईत रुग्णालयात असताना त्यांना अटक का केली नाही. त्याची विचारपूस का नाही केली. गाडीत बसणे म्हणून ३०४ चा गुन्हा दाखल होत नाही असा दाखला त्यांनी दिला.यातील चालक कोण असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे दोन मुलांचा तपास पोलिसांनी करावा या न्यायालयात गाडी चालवण्यात असल्याचा कोणताही पुरावा त्यांनी दिलेला नाही. म्हणून मनुष्यवधाचा गुन्हा हा कायद्याचा अतिरेक आहे असे त्यांनी न्यायालयासमोर सांगितले. त्यांना हा गुन्हा नोंदवता येत नाही असेही त्यांनी यावेळी न्यायालयासमोर आपले म्हणणे मांडले.
जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी या ठिकाणी 7 मे रोजी कार-मोटरसायकलचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. दरम्यान संशयित आरोपी यांच्यावर मुंबईतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान अपघाताची घटना घडून १७ दिवस उलटले तरी देखील पोलीस कोणतीच कारवाई करत नसल्याचा आरोपी गावकऱ्यांनी केला होता, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर तपास अधिकारी देखील बदलण्यात येऊन त्या ठिकाणी डीवायएसपी संदीप गावित यांची नियुक्ती करण्यात आली.
तपास अधिकारी यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी तात्काळ आरोपींना ताब्यात घेण्यासाठी एक टीम मुंबई येथे पाठवून दि. २३ रोजी दुपारी त्यांना ताब्यात घेण्यात आले. आज दि. २४ रोजी संशयित अर्णव कौल व अखिलेश पवार या दोघांना दुपारी पोलीसांनी न्यायालयात हजर केले. डीवायएसपी व तपास अधिकारी संदीप गावित यांनी त्यांच्या १४ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली.यावर प्रकाश बी पाटील यांनी हरकत घेतली. त्यांनी फिर्यादीवरच दिलेल्या फिर्यादीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फिर्यादीला दुसऱ्या व्यक्तीने सांगण्यावरून ही माहिती दिलेली आहे.असं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. दोघा आरोपीच्या वतीने बचावात जोरदार युक्तिवाद केला.










