- वाहान विक्री एजंट बांधवांना सरकारी मदत मिळावी – मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना जळगाव जिल्ह्याच्या वतीने इमेलद्वारे पाठवले पत्र
जळगाव,(प्रतिनिधी) – वाहन विक्री एजंट बांधव दिवसेंदिवस अडचणीत येत आहे, कामधंदे बंद असल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने वाहन विक्री एजंट बांधवाना सरकारी मदत मिळावी
अशी मागणी भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना जळगाव जिल्ह्याच्या वतीने इमेलद्वारे पाठवले पत्र पाठवून करण्यात आली आहे.
राज्यात कोरोना सारख्या महामारी विषाणुचा फैलाव जोरात सुरू आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना महाराष्ट्रातील नागरीक करत आहेत,
त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जनता कर्फ्यु व लाॅक डाउन सारखे अनेक चांगले मोठे निर्णय घेतले आहेत परंतू त्याचा परिणाम अाम्हा सामान्य वाहान विक्री एजंट (broker) कार्यरत बांधवांवर होत आहे. आमचा पूर्ण सिजन उध्वस्त झाला आहे. आमच्या सर्व एजंट बांधवांचे हातावर पोट आहे. रोजचा दैनंदिन खर्च चालवणे सामान्य एजंट बांधवांना जड झाले आहे त्यात पुढचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे व कुणाला सांगूहि शकत नाही. अाम्हा महाराष्ट्रातील सर्व वाहान विक्री एजंट (broker) बांधवांनाचे कधी आर्थिक वीवंचनेचे कोणती कंपनी सामाजीक संस्था व समाज कुठे कथन व चिंतन ही कोणी करीत नाही सहाय्य मागावे तरी कुणाला सरकार सर्व स्तरांतील समाजाला नोकरदार बांधकाम क्षेत्रात काम करणारे वर्गास मदत जाहीर करित आहे तरी वाहान विक्री एजंट (broker) बांधवावर अन्याय नको त्यांनाही आर्थिक सहाय्य मिळावे ही सरकारला कळकळीची विनंती पत्र भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अशी माहिती भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना जळगाव जिल्हाध्यक्ष हितेश पाटील यांनी प्रसिद्ध पत्रकान्वय केली आहे.