मुंबई,(प्रतिनिधी) राज्यात रुग्ण दुपटीचा दर 7 दिवसांवर गेला आहे त्यामुळे राज्यातील चित्र आशादायी आहे. नागरीकांनी घाबरू नये, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला असतांना केले आहे.
कोरोनाशी लढतांना आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे, चाचण्या केल्या जात आहेत, सर्वेक्षण होत आहे. आयसोलेशन आणि क्वारंटाईन केले जात आहे. राज्यात रुग्ण दुपटीचा दर 7 दिवसांवर गेला आहे त्यामुळे राज्यातील चित्र आशादायी आहे. नागरीकांनी घाबरू नये असे ते यावेळी म्हणाले.
मंबईत संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याचे काम उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे. कमी जागे मुळे होम क्वारंटाईन शास्त्रीय पद्धतीने होत नाही, अशा वेळी दाट वस्त्यांमधील नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जाईल. त्यासाठी शाळांमध्ये खाटा टाकून तशी व्यवस्था केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.















