जळगाव – खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व मू.जे.महाविद्यालय् यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “नाम-रमण:२०२०” परिषदेच्या दुसर्या दिवशी सकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रा..संजय ढोले यांनी विशेष व्याख्यानात सद्ध्या कळीचा विषय असलेल्या “न्यून्क्लिअर बँटरिज्”या विषयी अत्यंत महत्वाची माहिती दिली.रेडीओअक्टीव मटेरीअल वापरून तयार केलेल्या या बँटरीजचे आयुष्य खूपच असल्याने अवकाशात विवध उपकरणांमध्ये त्यांची उपयुक्तता सिद्ध होते.भविष्यात या न्यून्क्लिअर बँटरिज उर्जा क्षेत्रात एक नवीन क्रांती घडवू शकतात.
पुढील व्याख्यानात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड येथील प्रा.राजाराम माने यांनी नँनोमटेरीअलस् बनवण्याच्या नवनवीन पद्धती सांगितल्या. नँनोटेक्नाँलोजी वापरून उच्च उर्जा व शक्ती साठवणूक करणाऱ्या डीव्हायसेस विषयी विस्तृत विवेचन केले.पुढे त्यांनी गँस व केमिकाल सेंसर तसेच सुपर-कपँसीटर मानवी जीवनात उत्क्रांती आणू अशी आशा व्यक्त केली. आजचे शेवटचे व्याख्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रा.बी.एल.चौधरी यांनी दिले.यांत त्यांनी “ए पाँसिटीव इंटरँक्शन ऑफ नँनोपार्टिकल्स् ऑन प्रोबायोटीक कल्त्चर”या विषयावर सविस्तर विवेचन केले.पुढे त्यांनी नँनोपार्टिकल्स् ची उपयुक्तता कँसर या रोगाशी लढण्यात कशी होते तसेच त्यांचा उपयोग टूथपेस्ट मध्येहि होऊ शकतो असे सांगितले.संशोधनाचे रुपांतर पेटंटमध्ये करण्याविषयीची माहिती दिली.सतत मेहनत करूनच चांगले दर्जेदार संशोधन होत असल्याच सांगितलं.
आजच्या टेक्निकल सत्रात २० संशोधकांनी आपापले शोधनिबंध सादर केले.या साठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील फिजिकल सायंसेसचे संचालक प्रा..डी.एस.पाटील यांनी अध्यक्षपद भूषविले.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालय,मुक्ताइ नगरचे प्राचार्य व्ही.आर.पाटील होते.या प्रसंगी बोलतांना त्यांनी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या प्रगती बद्दल सानाधन व्यक्त केले.जीवनात सकारात्मकता अतिशय महत्वाची असल्याच ते म्हणाले. या प्रसंगी प्रा..डी.एस.पाटील, प्रा..बी.एल.चौधरी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे,आयोजन सचिव डॉ.व्ही.आर.खडसे मंचावर उपस्थित होते.संयोजक डॉ.के.बी.महाजन यांनी पार पडलेल्या परिषदेचा आढावा सादर केला.शेवटी उत्कृष्ट पोस्टर्सला पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमच सूत्रसंचालन प्रा.कविता पाटील व प्रा.भावना मानेकर यांनी केले.आभार डॉ.प्रतिभा निकम यांनी मानले.














