नवी दिल्ली – नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा (एनआरसी) या दोन्ही तानाशहांनी तयार केलेले ध्रुवीकरणाचे शस्त्र आहेत अशी टीका राहुल गांधींनी केली. युद्धात मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या शस्त्रांना इंग्रजीत ‘वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन’ (डब्लूएमडी) असे म्हटले जाते. त्याच धर्तीवर राहुल गांधींनी या दोन्ही कायद्यांना वेपन्स ऑफ मास पोलराइसजेशन (ध्रुवीकरणासाठीचे डब्लूएमपी) असे संबोधलेल आहे. अशा शस्त्रांना एकच उत्तर योग्य राहील ते म्हणजे, सत्याग्रह… एनआरसी आणि कॅब विरोधात शांततापूर्वक आंदोलन करणाऱ्यांच्या आपण पाशीशी आहोत असे काँग्रेस नेते राहुल यांनी ट्वीट केले आहे.
तर दुसरीकडे, काँग्रेस नेते आणि माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी नागरिकत्व विधेयकाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. त्यावर बुधवारी 18 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. जयराम रमेश यांनी कोर्टात ही याचिका वैयक्तिक स्वरुपात दाखल केली आहे. देशातील सद्यस्थिती आणि एकूणच या कायद्याचे स्वरुप पाहता सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर याचिकेवर निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या याचिकेवर सुनावणीस होकार दिला आणि 18 तारीख निश्चित केली अशी माहिती जयराम रमेश यांनी ट्विट करून दिली आहे.















