मुंबई : राज्यातील राजकारणाला रोज काहीना काही नवीन घडामोडी घडत आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना तातडीनं मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामागचं कारण अद्याप गुलदस्त्यात असून मात्र या बातमीनं चर्चेला उधाण आलं आहे.
सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीनं मुंबईत हजर राहा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना दिले आहेत. त्यामुळे मुंबईबाहेर असलेले सर्व मंत्री मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. आज दुपारी एक वाजण्यापूर्वी सर्व मंत्री मुंबईत हजर राहणार आहेत.
मिळत असलेल्या माहितीप्रमाणे सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिमध्ये सर्व मंत्र्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. तातडीनं बैठक का बोलावण्यात आली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.
हे सुद्धा वाचाच..
एका रात्रीत सगळं बदललं; एलॉन मस्कचा निर्णयानंतर अनेक सेलिब्रिटींच्या खात्यातून ब्लू टिक्स गायब
LIC ची जबरदस्त योजना! 253 रुपयाच्या गुंतवणुकीवर मिळेल 54 लाख, जाणून घ्या कसे?
राज्य मंडळाच्या शाळांना आजपासून सुटी ; ‘या’ तारखेपर्यंत शाळा बंद राहणार
राज्यातील 15 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
आमदारांच्या अपात्रेबाबतच निकाल कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. तसेच सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडी पहाता या बैठकीकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश का दिले याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र या बातमीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.