भुसावळ विभागात जैन इरिगेशनच्या आयात निर्यातीत ७० टक्के वाटा
जळगाव – रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत सुरु झालेल्या कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून (काँकर )च्या माध्यमातून नवरत्न कंपनीने कंटेनर डेपो भुसावळ येथील वरणगाव रॉड येथे सुरु केला असून विविध उद्योजकीय सेवा कमानीच्या माध्यमातून २००२ पासून पुरविण्यात येत आहे .
देश विदेशात विविध प्रोडक्ट्स आयात निर्यात केली जात असून आता देशांतर्गत तसेच विदेशातही कंपनी व्यवसाय वाढीचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन करीत असल्याचे प्रतिपादन आयआरटीएसचे ऑफिसर आणि मध्य विभागाचे मुख्य कार्यकारी व्यवस्थापक अनुपकुमार सतपती यांनी आज एमआयडिसीतील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली . यावेळी नागपूरचे चीफ जनरल मॅनेजर अनिल ठाकूर, औरंगाबाद विभागाचे चीफ मॅनेजर अभिनव दुपारे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अनुपकुमार सतपती म्हणाले कि , २००२ साली सुरु झालेल्या या व्यवसायाने दरवर्षी १०० टक्के वाढ केली आहे . दरवर्षी आयातीत चार हजार कोटींचा माल आयत तर साडेसहा हजर कोटींचा माल निर्यात होत आहे . भुसावळ रेल्वेच्या दृष्टीने वाहतुकीस सोयीस्कर असून जैन इरिगेशनच्या देश विदेशात आयात निर्यात करण्यात ७० टक्के वाटा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले . देशांतर्गत व्यापाराला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. मशिनरी ,क्रेन्स , मनुष्यबळ यासह विविध टेक्नॉलॉजीचे पाठबळ कंपनीकडे उपल्बध असल्याचे अनिलकुमार सतपती यांनी सांगितले .