जबलपूर : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. हे प्रकरण ताजं असतानाच अशीच एक धक्कादायक घटना पाच दिवसांपूर्वी मध्य प्रदेसशातील जबलपूर येथील एक रिसॉर्टमध्ये घडली. रिसॉर्टमध्ये २५ वर्षीय तरूणीचा तिच्याच प्रियकराने गळा कापून हत्या केली. त्यानंतर प्रियकर तेथून फरार झाला. तो अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. मात्र, या काळात तो दररोज सोशल मीडियावर पोस्ट टाकून पोलिसांना आव्हान देत आहे.
हे प्रकरण जबलपूर येथील मेखला रिसॉर्टमधील आहे. प्रेयसीच्या हत्येनंतर फरार झालेला आरोपी अभिजीत पाटीदार त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवरून मध्य प्रदेश पोलिसांना सतत आव्हान देत आहे. त्याने मृत गर्लफ्रेंडच्या आयडीवरून 5 पोस्ट आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका धक्कादायक व्हिडिओमध्ये अभिजित म्हणतो, “बेवफाई नाही करायची.” यानंतर तो पलंगावरून एक ब्लॅंकेट उचलतो आणि त्याखाली महिलेचा मृतदेह दिसतो. हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी त्याने सोशल मीडियावर लिहिलं होतं की, “आय लव्ह यू बाबू, आपण स्वर्गात भेटू… सॉरी बाबू.”
दुसर्या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिजितने आपण पाटण्यातील व्यापारी असल्याचं सांगितलं होतं. तसंच त्याने जितेंद्र कुमार आपला बिझनेस पार्टनर असल्याचं म्हटलं होतं. अभिजितने जितेंद्रचा साथीदार सुमित पटेलचेही नाव घेतलं होतं.
मृत महिलेचे जितेंद्र व सुमित या दोघांशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप त्याने केला होता. तसंच महिलेने जितेंद्रकडून सुमारे 12 लाख रुपये उसने घेतले होते आणि ती जबलपूरला पळून गेली होती. जितेंद्रच्या सांगण्यावरूनच आपण महिलेची हत्या केल्याचा दावा त्याने व्हिडिओत केला होता.
हे पण वाचा..
22 वर्षीय प्रेयसीकडून लग्नासाठी दबाव, 42 वर्षीय विवाहित प्रियकराने दिला भयंकर मृत्यू
सरकारची जबरदस्त योजना, 10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार, हे लोक करू शकतात अर्ज
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार; पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
प्रेयसीच्या हत्येनंतर फरार झालेला आरोपीवर पोलिसांनी लाखोंचे बक्षीस जाहीर करूनही तो कायद्याच्या कचाट्यातून बाहेर आहे. दरम्यान, जबलपूरचे अतिरिक्त एसपी शिवेश सिंह बघेल म्हणाले की, “आम्ही सायबर क्राईम टीमला यासंबंधी सर्व तपशील विचारले आहेत. मृत व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करणारी व्यक्ती ओळखीची व्यक्ती असू शकते किंवा ती आरोपी देखील असू शकते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटीदारने केवळ हत्याच केली नाही, तर जबलपूरमधील व्यावसायिकांची लाखोंची फसवणूकही केली आहे.”