जळगाव : कोरोना पार्श्वभूमीवर अडीच वर्षांपासून बंद असलेली भुसावळ- देवळाली पॅसेंजर अखेर पुन्हा धावणार आहेत. ही भुसावळहून येत्या 16 सप्टेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता नियमीत सुटेल. मात्र ही गाडी पॅसेंजरएवजी मेल एक्सप्रेस असून भाडेही जास्त असेल. त्यामुळे प्रवाशांवर अतिरिक्त तिकिटाच्या रकमेचा भार पडणार आहेत.
गाडी क्रमांक 11114 अप भुसावळ- देवळाली ही भुसावळहून येत्या 16 सप्टेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता नियमीत सुटेल. तर गाडी क्रमांक 11113 डाऊन देवळाली-भुसावळ पॅसेंजर ही देवळालीहून 17 सप्टेंबरला सकाळी 7:20 वाजता नियमित सुटेल.या गाडीची देवळालीहून सुटण्याची वेळ पहाटे पाच एवजी 7.20 अशी आहे. त्यामुळे नाशिक ते नांदगाव दरम्यानच्या नोकरदार, व्यावसायिक आदींची सोय झाली आहे.
हे पण वाचा :
जळगाव जिल्हा ऑनर किलिंग च्या घटनेने हरला ; तरुणाची गोळी मारून तर तरुणीचा गळा दाबून हत्या
..अन् कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर महाजनांनी धरला ठेका
करदात्यांना मोठा झटका, सरकारने अटल पेन्शन योजनेत केले बदल; दुसऱ्यांदा नियम बदलले
करोनापूर्वी ही पॅसेंजर पहाटे पाचला देवळालीहून सुटत होती. त्यामुळे नाशिकमधील खांदेशवासीयांना भुसावळला दुपारी बाराच्या आत पोहचता येत असे. जादा भाडे व नवीन वेळेमुळे खांदेशवासीयांची गैरसोय होणार आहे.