मुंबई : महाराष्ट्र भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता नव्याने भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपद निवड करण्यात आली आहे. तर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी आमदार आशिष शेलार यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
बावनकुळे हे ओबीसी नेते आहेत. तर शेलार हे मराठा समाजातून येतात. त्यामुळे भाजपने मराठा आणि ओबीसी नेत्यांना महत्त्वाचे पद देऊन जातीय समीकरणे साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा फायदा भाजपला येत्या काळात होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच बावनकुळे यांनी त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिल्याच्या वृत्ताला दुजोराही दिला आहे.
राज्यात भाजपचे प्रदेशाध्यक्षपदासाठी आशिष शेलार यांचे नाव चर्चेत होते. मात्र आता बावनकुळे यांची प्रत्यक्ष निवड करण्यात आली आहे. आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघटन कौशल्य आणि अनुभवी नेतृत्व म्हणून प्रदेशाध्यपदी बावनकुळे यांची वर्णी लागली आहे.
हे पण वाचा :
आता मिठाची चवही महागणार ; टाटा मिठाच्या किमतीत होणार वाढ
Video : ‘एक आमदार की किमत तुम क्या जानो’.. पंकजा मुंडेंचा डायलॉग
सोन्याच्या दरात वाढ, काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे भाव?
महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला ; जिवे मारण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार, नराधम नात्यातल्याच
तसेच मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई भाजप अध्यक्ष पदासाठी आशिष शेलार यांना पसंती देत त्यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या नियमानुसार मंत्रिपद असलेल्या नेत्याकडे पक्षातील मोथे पद दिले जात नाही. त्यानुसार आता भाजपच्या बावनकुळे व शेलार या दोघांना संघटनात्मक बांधणीकरिता पदे देण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.