फतेहपूर/बांदा : यूपीच्या बांदा जिल्ह्यात आज यमुना नदीत मोठी दुर्घटना घडली. ३० हून अधिक लोक ज्या बोटीत होते ती बोट नदीत बुडाली.
सध्या 20 जण बुडाल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हा प्रशासनाला मदत आणि बचाव कार्याच्या सूचना दिल्या आहेत. ही बोट फतेहपूरला जात असून लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू असल्याचे नायब तहसीलदारांनी सांगितले.
बोटीवर ३० हून अधिक लोक होते. ठाणे असोठार येथील राम नगर कौहान घाटासमोर बोट बुडाली आहे. बोटीवरील सर्व लोक नदी पार करून फतेहपूरला जात होते. त्याच वेळी ही मोठी दुर्घटना घडलीय. या घटनेबाबत तहसीलदारांनी माहिती दिली की, सुमारे 20 जण बुडाल्याची माहिती आहे, त्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.