मुंबई: शिवसेनेला ५०-५० फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देणार असा शब्द भारतीय जनता पक्षाने कधीच दिला नव्हता, असे खळबळजनक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. लोकसभेआधी जे ठरले होते, तेच द्यायचे आहे, आम्ही चुकीचे काही मागत नाही, असे सांगत, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फणा काढून बोलण्याची गरज नाही, मी पक्षाची भूमिकाच मांडत आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले असल्याचे शिवसेनेचे खासदार यांनी सांगितले आहे.
शिवसेनेला ५०-५०च्या फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देणार असे आश्वासन भारतीय जनतापक्षाने कधीन दिलेले नव्हते, असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. आपण स्वत: अमित शहा यांना फोन करून असे आश्वासन शिवसेनेला दिले का, असे विचारले असता, शहा यांनी आपण असे आश्वासन शिवसेनला दिले नसल्याचे शहा यांनी म्हटल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर संजय राऊत यांनीही तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ज्यांच्याकडे १४५ आमदारांचा पाठिंबा आहे, असा कुणीही सरकार स्थापन करून मुख्यमंत्री बनू शकतो, उद्या एकनाथ खडसेही तसे म्हणू शकतात, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरही तसे म्हणू शकतात आणि शरद पवाही तसे म्हणू शकतात, असेही राऊत म्हणाले.
ज्यांच्याकडे १४५ आमदारांचा पाठिंबा आहे, असा कुणीही सरकार स्थापन करून मुख्यमंत्री बनू शकतो, उद्या एकनाथ खडसेही तसे म्हणू शकतात, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरही तसे म्हणू शकतात आणि शरद पवाही तसे म्हणू शकतात, असेही राऊत म्हणाले.















