मुंबई : भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राजकीय वनवास आता संपण्याची चिन्हे आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक आणि विधान परिषदेच्या दहा जागांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जूनला निवडणूक होणार आहे. तर विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे.
याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. विधान परिषद उमेदवारीवर चर्चा करण्याकरिता काल रात्री राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांची भेट घेतली. विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याला उतरवायचं, यावर चर्चा झाली.
सूत्रांच्या माहितीनुसार, यात एकनाथ खडसे यांचं नाव प्राधान्यानं पुढे आलं असून लवकरच नाथाभाऊंच्या नावाची घोषणा केली जाईल.एकनाथ खडसे यांच्यासह रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. रामराजे हे विधान परिषदेचे सभापती आहेत. त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हे पण वाचा :
लाच भोवली; दोन सहाय्यक अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
मोठी बातमी ! उद्या जाहीर होणार 12 वी परीक्षेचा निकाल
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर उष्णतेचा कहर ; महाराष्ट्रासह ‘ही’ राज्य अलर्टवर
..तर मास्क सक्तीचा आणि निर्बंधांचा निर्णय घ्यावा लागेल ; मंत्री विजय वडेट्टीवार
राज्यात उन्हाची लाट पुन्हा वाढू लागली, ‘या’ भागात उष्ण लाटेचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसेंचं पूनर्वसन करण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुरु होता. त्यासाठी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत खडसेचं नाव पाठवण्यात आलं होतं. पण राज्यपालांनी दोन-अडीच वर्षानंतरही आमदारांची निवड केली नाही. अखेर एकनाथ खडसेंचा राजकीय वनवास थांबवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेत ते निवडून आले तर कदाचित त्यांना मंत्रिमपदाची देखील संधी मिळू शकते. पण आताच त्याचा अंदाज बांधणं कठीण आहे. आगामी काळात या सर्व गोष्टी अधिक गडदपणे स्पष्ट होतील.