जळगाव, (प्रतिनिधी)- कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची नोंद सकाळ वृत्तपत्राने घेत अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना सकाळ वृत्तपत्र समूहाने ‘आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार जाहीर करण्यात आला असून आज दिनांक 16 रोजी डॉ. रामानंद यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोना काळात दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असंताना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद,सर्व डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी तसेच सर्व घटकांनी उत्तम सांघिक कामगिरी केल्यामुळेच जिल्ह्यातील कोरोना नियंत्रित करण्यात यश आले होते.कोरोना काळात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी अहोरात्र रुग्णसेवा केली याचं कार्याची दखल घेऊन त्यांना विविध संस्थानी यापूर्वी देखील सन्मानित केलं असून आज सकाळ वृत्तपत्र समूहाने देखील नोंद घेऊन ‘आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आहेत. त्यांना मिळत असलेल्या या पुरस्काराने सर्वच स्तरातून अभिनंदन होतं आहे.