जळगाव | हवामान खात्याने सोमवारपासून पुढील तीन दिवस राज्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचे संकेत दिले होते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील विविध भागात काल रात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे काढणीवर आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज (मंगळवार) जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे हवेत दमटपणा दिसून आला, तर दुपारी तप्त उन्हाची अनुभूती जिल्हावासीयांना आली. सायंकाळी प्रचंड उष्मा जाणवून रात्री १० वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. आज जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांची आणखी चिंता वाढली आहे.
हे देखील वाचा :
खळबळजनक ! प्रेमसंबंधाच्या संशयाने मुक्तळ ग्रा. पं. सदस्याचा खून
शिवसेनेला आणखी एक धक्का : आदित्य ठाकरेंच्या ‘या’ निकटवर्तीयावर आयकर विभागाचा छापा
विधानसभेत गिरीश महाजनांची डुलकी, शेलारांनी खुणावताच…? व्हिडीओ व्हायरल
31 मार्चपूर्वी पूर्ण करा ‘ही’ 5 कामे, अन्यथा बसेल भुदंड, जाणून घ्या
रब्बी पिकांच्या नुकसानीची शक्यता
जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर 2021च्या अतिपावसामुळे खरीप हंगामात बरेच नुकसान झाले आहे, तर रब्बी हंगाम बरा होईल या अपेक्षेने बहुतांश शेतकऱ्यांनी ज्वारी, बाजरी, मका, सूर्यफूल, गहू, हरबरा आदी वाणांची लागवड केली आहे. जिल्ह्यात सुमारे अडीच ते तीन लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील वाणांची लागवडीचा अंदाज असून बऱ्याच ठिकाणी गहू, हरबरा पीक कापणी होऊन काढणी देखील सुरू आहे, परंतु या बेमोसमी पावसामुळे कापणी व काढणीस आलेल्या रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे.