रायगड: राज्यभरात सध्या बारावीची परीक्षा सुरु आहे. मात्र, या परीक्षेच्या पहिल्या दिवशी अभ्यास न झाल्याच्या भीतीने रायगडमधील एका विद्यार्थ्याने शाळेबाहेरच्या जंगलात गळफास घेऊन जीवन संपवले. प्रकाश बांगारे (मुळ रा.पिंपळगाव, नागोठणे वय १७) असे या विद्यार्थ्याचे नाव असून ही घटना रोहा तालुक्यातील सानेगावमध्ये घडली.
4 मार्च रोजी 12 वी बोर्डाचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होता, याच परीक्षेच्या भीतीने प्रवेश प्रकाश बांगारे या युवकाने टोकाचं पाऊल उचललं. प्रवेश प्रकाश बांगारे हा विद्यार्थी शिक्षणासाठी सानेगाव येथील आश्रमशाळेत वास्तव्य करीत होता.
गेली दोन वर्ष लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन पद्धतीने मुल शिकत घेत होती. गावाकडील भागात इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे मुलांना या दोन वर्षात नीट शिक्षण मिळालं नाही आणि आत्ता परीक्षा ऑफलाईन असल्यामुळं या विद्यार्थ्याने भीतीने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरक्षक संजय पाटील यांच्या मार्गदशनाखाली रोहा पोलीस करीत आहेत.