देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघात झाल्याने बिपीन रावत यांच्यासह १४ जणांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला होता. ८ डिसेंबर २०२१ रोजी हा अपघात झाला होता. या हेलिकॉप्टर अपघाताने संपूर्ण देश हादरला होता. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखालील त्रि-सेवा तपास पथकाने ५ जानेवारी रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना चौकशीतील निष्कर्षांची माहिती दिली.
देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत सारखे मोठे अधिकारी यांचा अपघातात मृत्यू झाल्याने अपघाता संदर्भात देशवासियांना हा अपघात नेमका झाला कसा? आणि कशामुळे झाला. असे अनेक प्रश्न पडले होते.या अपघाताची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.
चौकशीअंती त्यांनी सांगितलंय की, या संपूर्ण घटनेच्या पाठीमागे कसल्याही प्रकारचा कट होता किंवा कुठला तांत्रिक बिघाड हेलिकॉप्टर होता वा कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष झालं होतं, अशी कोणतीच बाब समोर आलेली नसून तमिळनाडू राज्यातील खोऱ्यातील हवामानात अनपेक्षित बदल झाल्याने हेलिकॉप्टर ढगांमध्ये घुसल्याने हा अपघात झाल्याचे चौकशी पथकाने सांगितलं आहे.
अचानकपणे वातावरण बदललं आणि हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला आणि ते पायलटच्या नियंत्रणात न राहता ढगामध्ये गेल्याने त्याचा मार्ग भरकटल्याचा अहवाल समोर आला आहे. या समितीने सगळ्या बाबींची मदत घेऊन, घटनेशी निगडीत लोकांची साक्षही नोंदवली आहे. त्यातूनच हा अहवाल त्यांनी सादर केला आहे. हेलिकॉप्टरमध्ये कुठल्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड किंवा कटकारस्थान नसल्याची माहिती समोर आली आहे.
ओमिक्रॉन व्हेरिएंटची 2 सर्वात मोठी लक्षणे, कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा पूर्णपणे भिन्न
रेल्वेची मोठी घोषणा, फेब्रुवारीपर्यंत या ६२ ट्रेन रद्द, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट
खुशखबर! आता शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 सह 36000 रुपये मिळणार, हे काम त्वरित करा
रोज फक्त 1 लिंबू खाल्ल्याने तुम्हाला मिळतील 5 आश्चर्यकारक फायदे