बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील 24 वर्षीय विवाहिता शीतल सपकाळ ही पती आणि पोटच्या दोन मुलांना सोडून गावातीलच तिच्या प्रियकरासोबत महिनाभरापूर्वी पळून गेली होती. पण दोघांमध्ये मधल्या काही दिवसांत काय झालं माहिती नाही, अचानक राहत्या घरी दोघांनीही गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.
देवधाबा येथून दोघेही पळून गेल्यावर मुंबईमधील भांडुपच्या रामनगर परिसरात भाड्याने घर घेऊन पती-पत्नी म्हणून दोघे एकत्र राहत होते. मात्र 21 ऑक्टोबरला दोघांनी राहत्या घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. यामुळे गावात एकच खळबळ उडाली.
मृतक विवाहिता शीतल हिला चार आणि सहा वर्षाची दोन मुले असून दोघांनाही सोडून गेली होती. तर शीतल हरवल्याची तक्रार मलकापूर पोलीस स्टेशनला देण्यात आलेली होती, पोलिसांनीही शोध घेतला होता. पण त्यांचा पत्ता कळाला नव्हता.
अखेर 21 ऑक्टोबर दिवशी दोघांनीही गळफास घेतल्याची बातमी आली अन् गावात स्मशान शांतता पसरली. एकतर विवाहित शीतल नवऱ्याला आणि पोटच्या दोन मुलांना सोडून प्रियकराकडे निघून गेली. बरं एक महिन्याच्या आत असं काय घडलं, की दोघांनीही गळफास घेऊन आपलंल जीवन संपवलं, याचा विचार गावातील नागरिक करत राहिले.