जळगाव – ‘जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज सोमवारी शेवटचा दिवस आहे. असे असताना आम्हाला गाफील ठेवून इतर पक्षांची खलबते सुरु होती असा आरोप करत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माघारीपर्यंत युतीविषयी चर्चा होऊ शकते असे संकेत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेत.
त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसवगळता इतर पक्षांची युती होते का? या विषयीची उत्सुकता त्यांनी कायम ठेवली आहे. रविवारी काँग्रेसवगळता इतर पक्षांची बैठक होणार होती मात्र सायंकाळी भाजपा कोअर कमिटीची गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
पण नंतर मात्र, भाजप जातीयवादी पक्ष असल्याचे सांगून वेगळी भूमिका घेतली. हा प्रकार म्हणजे, काँग्रेसचे सोयीचे राजकारण होते’, अशी टीका महाजन यांनी केली. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सर्वपक्षीय पॅनलबाबत सकारात्मक होतो. मात्र, तिन्ही पक्षांनी सोयीचे राजकारण केल्याचंही महाजन म्हणाले. इतर पक्षातील लोक आमच्या संपर्कात आहेत. ते उमेदवारी देण्याची मागणी करत आहेत. ते सक्षम असतील तर त्यांच्या उमेदवारीचा भाजप नक्की विचार करेल, असेही महाजन म्हणाले,














